नमस्कार मित्रांनो १६ एप्रिल शनिवारचा दिवस आणि ह्या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी ह्या दिवशी आहे मित्रांनो ह्या हनुमान जयंतीचा उत्सव हा संपूर्ण भारतभर तसेच पूर्ण विश्वभर साजरा केला जातो. अनेकजण भक्त आपली संकटे दूर करण्यासाठी, घरावर किंवा घरातील लोकांना काही बाधा झालेली असेल तर ती दूर करण्यासाठी ह्या हनुमान जयंतीला विशेष अशी पूजा करतात काही उपाय देखील करतात.
मित्रांनो हनुमान जयंतीच्या दिवशी आपण धनप्राप्तीसाठी करावयाचा एक उपाय आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. कि जो तोटका आपल्याला धनाची प्राप्ती करवतो, ह्या ना त्या मार्गाने आपण ज काही काम करत आहात किंवा इतर काही अन्यत्र मार्गाने आपल्याला धन पैसा संपत्ती आपल्या जीवनात नक्की येईल, फक्त तुम्ही ह्या हनुमान जयंतीदिवशी आपण मध्यरात्री हा एक उपाय करायचा आहे.
मित्रांनो हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी चालेल परंतु रात्री ११ नंतर ची वेळ हि चांगली मानली जाते. मित्रांनो ह्या उपायासाठी आपल्याला एक साबूत लवंग घ्याची आहे. आपण एक साबूत लवंग अशी कि जी तुटलेली फुटलेली नसावी व तिला फुल असावे. मित्रांनो आपण ह्या उपायसाठी काही मोहरीचे तेल लागेल ते देखील आपण ह्या उपायासाठी घ्या, किंवा त्याला पर्याय आपण जाईचे तेल वापरले तरी चालेल.
मित्रांनो आपण आपल्या आसपासच्या हनुमानाच्या मंदिरात जवळ असेल तर तिथे जा, आणि ते शक्य नसेल तर आपण अगदी हनुमानांचा एक फोटो घेतला तरी चालेल. त्यानंतर आपण हनुमानांची पूजा आपण करायची आहे मात्र एक काळजी घ्या कि पूजा करताना हनुमानांचे तोंड हे दक्षिण दिशेला राहील ह्याची काळजी आपण घ्यावी. पूजेसाठी आपण एक सुंदर पाट घेऊन त्यावर एक लाल रंगाचे वस्त्र अंथरायचे आहे त्यावर त्यांची मूर्ती किंवा फोटो ठेवा त्यानंतर त्यांची विधिवत पूजा करा त्यांना गूळ व भाजलेले हरभरे असतात ते आपण नैवैद्य म्हणून अर्पण करायचा आहे.
त्यानंतर आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, त्यानंतर आपण लाल रंगाची फुले त्यांना अर्पण करावीत आणि जो दिवा आपण लावला आहे त्या दिव्याची वात हि लाल रंगाची असेल तर अतिउत्तम जो कापूस किंवा धागा असतो त्याची वात बनवताना त्यात आपण केसर किंवा कुंकू मिसळायचे आहे व लाल वात करायची आहे. तर अशी वात आपण लावायची आहे त्यानंतर आपण दिवा लावल्यानंतर आपण त्या दिव्यात एक साबूत लवंग त्यात टाकायची आहे व दोन लवंग आपण हनुमानाच्या चरणी अर्पण करायच्या आहेत.
असा हा दिवा लावल्यानंतर आपण हनुमान चालीसाचा पाठ आपण करायचा आहे. आपली जी काही इच्छा असेल ती आपण बोलून दाखवायचॆ आहे, आपल्या कष्टाला फळ प्राप्त होऊन दे अशी प्रार्थना आपण हनुमानांच्या चरणी करायची आहे. त्यानंतर आपण ज्या दिव्यात एक लवंग टाकलेली आहे त्यानेच आरती ओवाळायची आहे. ह्या उपायाने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




