नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो २१ जून सोमवारचा दिवस आणि ह्या दिवशी आहे निर्जला एकादशी जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या एकादशीस निर्जला एकादशी म्हणले जाते. हआपल्या घरातील लोकांच्या चांगल्या आरोग्यसाठी सुखी जीवनासाठी आणि आपल्या सर्व इच्छांची पूर्ती करण्यासाठी निर्जला एकादशीचे व्रत केले जाते. सोबतच ह्या दिवशी अनेक उपाय व तोटके देखील केले जातात. आजच्या लेखात आपण व्रत व करायचे उपाय आपण सांगणार आहोत.
मित्रांनो ह्या निर्जला एकादशी दिवशी नावाप्रमाणेच लोक ह्या दिवशी पाण्याविना हे व्रत करतात. पण आपणास हे शक्य नसेल तर आपण फलाहार करून फक्त हे व्रत करू शकता.मित्रांनो अशी मान्यता आहे कि हे व्रत कारण्याऱ्यास धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते. चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी आपण खालील काही अत्यंत उपयोगी उपाय आपण नक्की करून पहा. जसे कि चांगले आरोग्य प्राप्ती साठी आणि मानसिक समस्या दूर करण्यासाठी आपण ह्या निर्जला एकादशीचा उपवास करा.
ह्या दिवशी आपण केवळ जलयुक्त आहार घ्या जसे कि फळांचा रस, किंवा दूध जितके जास्त शक्य असेल तितकी आपण आपल्या इष्ट देवतांची आराधना करा भगवान श्री हरी विष्णूंची उपासना करा. विशेष करून रात्रीच्या वेळी ह्या मंत्रांचा केलेला जप अत्यंत प्रभावी असतो. ओम नमो भगवते वासुदेवाय…! ओम नमो नारायणा…! अश्या प्रकारच्या मंत्रांचा जप करा.
ह्या निर्जला एकादशीच्या दिवशी आपण कमीत कमी बोला आणि आपली वाणीवरती संयम ठेवा कोणावरती रागावरती जाऊ नका, क्रोध करू नका. ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे ज्यांना बरकत यावी पैसे मिळावेत अशी ज्यांची इच्छा आहे अश्या लोकांनी ह्या दिवशी उपवास करा भगवान विष्णूंसोबतच आपण माता लक्ष्मीची देखील मनोभावे आराधना करा.
ह्या दिवशी गेजेन्द्र मोक्षाचा पाठ करणे खूप चांगले मानले जाते किंवा आपण विष्णुसहस्त्र नामाचा पाठ देखील करू शकता. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आपण भगवान श्री विष्णूंना नेवैद्य अर्पण करायचा आहे आणि त्या नैवेद्यावर आपण २ तुळशीची पाने उलटी टाकावीत. मात्र हि पाने आपण आदल्या दिवशी काढून ठेवावीत. ह्या दिवशी आपण तुळशीला अजिबात हात हि लावू नये. मित्रांनो धनप्राप्तीसाठी आपण मध्यरात्री आपण माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंना धनप्राप्तीसाठी प्रार्थना अवश्य करा.
अनेक लोकांच्या घरात वादविवाद भांडणे होत असतात अश्या वेळी मनःशांतीसाठी आणि मन शुद्धी साठी आपण ह्या दिवशी व्रत करून जास्तीत जास्त भगवान श्री हरीच्या नावाचा जप करा एकांतामध्ये राहून आपण प्रार्थना करा. तुम्हाला त्याची फळे अवश्य मिळतील सुखशांती लाभेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




