नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो २२ डिसेंबर बुधवारचा दिवस आणि ह्या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ह्या दिवशी आपल्या मनातील इच्छांची पूर्तता करण्यासाठी आपण भगवान श्री गणेशांची पूजा मनोभावे अवश्य करा ह्या भगवान गणेशांच्या पूजे नंतर आपण आजच्या लेखात काही छोटे पण तितकेच प्रभावी असे उपाय सांगणार आहोत, ते केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे बाधा दूर होतात.
सुरुवात करूयात ज्यांच्या विवाह कार्यात बाधा येत आहेत तुमच्या विवाहात लग्न जुळण्यात बाधा येत असतील तर ह्या संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पांचे पूजन करावे व पूजन झाल्यावर आपण ओम वक्रतुंडाय हुं ह्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. जर आपल्या घरात पोवळ्यांची किंवा प्रवाळांची माळ असेल तर अश्या माळेवर आपण हा जप केल्यास आपल्या विवाह कार्यात येत असणाऱ्या सर्व बाधा दूर होतात.
ज्यांच्या विवाहात समस्या उत्पन्न झाल्या आहेत, पतिपत्नीमद्ये वादविवाद असेल, संसार मोडकळीस आलेला असेल अश्या वेळी स्त्री वशीकरणाचा एक छोटासा मंत्र ओम वक्रतुंडाय हूं ह्या मंत्राचा जप आपण लाल हकेच्या माळेवर जप केल्याने आपल्या पतिपत्नीमधील सर्व बाधा दुर होतात. जर आपल्या जीवनात जास्त शत्रू झालेले असतील शत्रुपीडा असेल तर आपण ह्या संकष्टी चतुर्थीला हरिद्रा पिष्टी गणेशांचे पूजन नक्की करावे, हे अत्यंत फलदायी आहे. हरिद्रापिष्टी म्हणजे पश्चिम बंगाल मध्ये जे श्री गणेश बागलामुखी आहेत त्यांना हरिद्रमुखी असे म्हणले जाते.
संकष्टी चतुर्थीस ह्याचे पूजन केल्यास आपल्याला शत्रूंवरती सहज विजय प्राप्त करता येतो. जर ते शक्य नसेल तर कडुनिंबाच्या मुळांमध्ये निसर्गतः गणेशांची मूर्ती तयार होते, अश्या मूर्तीचे पूजन केल्याने देखील शत्रुपीडा पूर्णतः संपते. गणेशांच्या पूजेत आपण लाल रंगाची फुले लाल रंगाची फुले आपण अर्पण करावीत आणि शत्रूशांतीची प्रार्थना आपण करावीत.
ज्यांना धनप्राप्ती करायची आहे ज्यांना आर्थिक समस्या आहेत जीवनात त्यांनी ह्या संकष्टी चतुर्थीस गणेशांच्या अर्क काष्ठ मूर्तीचे पूजन आपण करू शकता. म्हणजेच रुईचे जे झाड असते त्या झाडात १० वर्षानंतर भगवान श्री गणेशांची मूर्ती निसर्गतः निर्माण होते. ह्या चतुर्थीस ह्या मूर्तीचे मोनोभावे पूजन करा, अशी मानले जाते कि अश्या मूर्तीचे प्रेत्येक संकष्टी चतुर्थीस पूजन केल्यास ह्या मूर्तीला श्वेतार्क गणेश असे देखील मानले जाते. अश्या मुले आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती देखील होते. तसेच जीवनातील सर्व बाधा देखील दूर होतात.
पूजा झाल्यानंतर आपण ह्या एका मंत्राचा देखील जप करायचा आहे मंत्र आहे ओम गं गौं गणपतये विघ्न विनशीने स्वहा । मित्रांनो आणखी एक उपाय आहे तो म्हणजे पार्थिव गणेश मूर्तीचा पार्थिव गणेश मूर्ती म्हणजे कोणत्याही पवित्र जागेवरून आणलेली माती किंवा अगदी तुम्ही तुमच्या शेतातील माती वापरली तरी चालेल ज्या ठिकाणी स्वछता आहे अश्या ठिकाणची मातीआपण गोळा करायची व ती गोळा करताना आपण ओम गण गणपतये नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. दगड गोटे बाजूला काढून आपण भगवान श्री गणेशांची मूर्ती आपण बनवायची आहे.
हि मूर्ती तयार करताना देखील आपण गणेश मंत्राचा जप करायचा आहे. ह्या गणेश मुर्तीसच आपण पार्थिव गणेश मूर्ती असं म्हणतो आणि संकष्टी चतुर्थीस ह्या अश्या पार्थिव मूर्तीचे पूजन केल्यास त्या व्यक्तीला सर्वसिध्दि प्राप्ती होते. सर्व प्रकारच्या शंक्तींची प्राप्ती करण्यासाठी कुंभाराच्या चाकाला जी माती लागते, त्या मातीपासून आपण एक छोटीशी गणपती मूर्ती बनवा व त्याची विधिवत पूजा करा व त्यानंतर आपण ११ माळा ह्या मंत्राचा जप करा ह्या महामंत्राचा जप केल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतील.
मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पूजा करताना गणेशाला २१ दुर्वा व जास्वंदीचे फुल नक्की व्हा. शक्य असल्यास उकडीचे मोदक आपण प्रसाद म्हणून देखील बनवा ह्या सर्व गोष्टी गणपती बाप्पांच्या प्रिय गोष्टी आहेत. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




