धार्मिक

३० एप्रिल २०२१ संकष्टी चतुर्थी गणातीला गुपचूप वाहा हि एक वस्तू .

मित्रांनो ३० एप्रिल शुक्रवारचा दिवस आणि ह्या दिवशी अली आहे संकष्टी चतुर्थी. ह्या दिवशी बाप्पांचे पूजन करतो. ह्या दिवशी आपण बाप्पांना अनके गोष्टी अर्पण करतो अशी मान्यता आहे कि ह्या दिवशी गणपती बाप्पा प्रसन्न झाल्यास अनेक प्रकारची संकटे दुःख आणि समस्या दूर होतात. गणपती बाप्पा हे विघ्णहर्ता आहेत आपले सर्व दुःख विघ्न हे गणपती बाप्पा नाहीसे करतात. मित्रांनो आपण ह्या दिवशी गणपती बाप्पांचे संकष्टी चतुर्थीचे व्रत अवश्य करावे. जर व्रत करणे शक्य नसल्यास त्यांना पूजेमध्ये आपण जास्वंदीचे फुल, तसेच दुर्वा ह्या आपण अर्पण कराव्यात.

ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कडुलिंबाचे जे झाड असते त्या झाडाच्या लाकडापासून बनलेल्या श्री गणेशांच्या मूर्तीचे पूजन केल्याने शत्रू शांत होतात. ह्या मूर्तीचे पूजन केल्याने वशीकरण देखील होते. बरेच लोक हरिद्रा पिष्टी च्या गणेश मूर्तीचे देखील पूजन करतात ज्यांना शत्रूला शांत करायचे आहे, ज्यांना शत्रूला वष करायचे आहे अशे लोक ह्या हरिद्रा पिष्टिच्या गणपतीचे पूजन करतात. मित्रांनो कडुलिंबाचे झाड हे अत्यंत महत्वपूर्ण असते आणि ह्या कडुलिंबाच्या ज्या मुळ्या असतात त्या मुळ्यांमध्ये कधी कधी गणपती बाप्पांची मूर्ती बनते अश्या मूर्तीचे पूजन करावे व त्यासमोर हस्ति पिशाचि स्वः! ह्या मंत्राचे जप करायचा आहे ह्यामुळे शत्रू तसेच कोणाला काही बाधा झाली असेल तर ती नाहीसे होतात.

मित्रांनो धनप्राप्तीसाठी ज्यांना खूप धन मिळवायचे आहे त्यांनी भगवान श्री गणेशांच्या अर्क काष्ठ प्रतिमाचे पूजन करावे अर्क म्हणजे मदार म्हणजेच रुई ह्या पांढऱ्या रुईच्या झाडाच्या लाकडापासून जर आपण हि श्री गणेशांची मूर्ती जर बनवून घेतली आणि अश्या मूर्तीचे आपण संकष्टी चतुर्थीला पूजन केले तर आपल्याला धन ऐश्वर्य ची प्राप्ती जरूर होते. अनेकजण पार्थिव गणेश पूजन करतात अशी मान्यता आहे कि अश्या मूर्तीचे जो पूजन करतो त्याला सर्व सिद्धीची प्राप्ती होते. पार्थिव म्हणजे एकाद्या पवित्र स्थनावून आपण माती घेऊन यायची आहे आणि हि माती घेताना ओम गण गणपतये नमः ! ह्या मंत्राचा जप करत माती गोळा करून झाली कि त्या मातीची एक छोटी मूर्ती आपण बनवायची आहे. अश्या मूर्तीची केलेली पूजा आपल्याला सर्व सिद्धिंची प्राप्ती करवते.

हे पण वाचा :-  तव्यावर रोज रात्री झोपताना ठेवा या दोन वस्तू घरात माता लक्ष्मीचे आगमन वाढेल.

अनेकदा आपल्या कामामध्ये अडचणी येत असतात जर अश्या अडचणी पासून कायमची सुटका करायची असेल तर आपण ह्या वेळी श्वेतार्क गणपती मूर्तीची पूजा करावी श्वेतार्क म्हणजे रुई अश्या पांढऱ्या रुईच्या झाडाच्या मुळाशी ११ ते १२ वर्षनंतर निसर्गतः गणेश मूर्ती बनते अश्या गणेश मूर्तीचे पूजन केल्यास आणि ह्या पूजनामध्ये आपण ओम गं गौ गणपतये विघ्न विनाशिने स्वः ह्या महामंत्राचा २१ मला जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात.

मित्रांनो हे सर्व उपाय आपण संकष्टी चतुर्थी दिवशी करत आहोत. आपण ह्या पैकी काही उपाय नक्की करा तुमच्य सर्वांवर गणपतीची अशीच कृपा राहूदे अशी प्रार्थना. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.