तुळशीचे रोपटे जेव्हा थोडे मोठे होते तेव्हा त्याच्या काही काड्या वाळतात आणि त्यांना तुळशीकाष्ट असे म्हणले जाते. ह्या वाळलेल्या काड्या ह्या तुळशीला कोणतीही इजा न पोहचता अगदी व्यवस्थित काढून घ्या. ह्या वाळलेल्या काढ्या ह्यात दैविक गुणधर्म आहेत, शक्ती आहे. ह्या लाकडांची आपण मिक्सर ग्राइंडर चा वापर करून त्यांची बारीक अशी पूड करून घ्या.
मित्रांनो तुळशीला हिंदू धर्मात मातेचे स्थान आहे, तुळस भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिया हे तिला विष्णूप्रिया असे देखील म्हण्टले जाते. ज्या घरात माता तुळशीची अगदी मनोभावे पूजा केली जाते, सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावला जातो त्या घरात नेहमी सुख समृद्धी नांदते. मित्रांनो ह्या ज्या काड्या आहे ज्यांची आपण पूड करून घेतली आहे, आपण बाजारातून कोणत्याही एका पूजेच्या ठिकाणी आपणास गोपिचंदन नक्की मिळेल.
हा चंदनाचा एक प्रकार आहे तो श्री हरी विष्णूंना खूप प्रिय आहे, तर ह्या गोपीचंदन असे आपण खरेदी करून आपण घरी आणि व त्या गोपचंदनाच्या सोबत आपण हि तुळशीकाष्ठाची पावडर आपण त्यात मिक्स करून दररोज आपण ह्याचा तिलक आपण भगवान श्री हरी विष्णूंना करा.
ह्याचा छोटासा तिलक जसे आपण हळदी कुंकवाचा तिलक लावतो अगदी तसे. ह्या गोपिचंदन व तुळशीकाष्ठाची पावडर मिश्रित टिळा आपण लावायचा आहे. जेव्हा जेव्हा आपण देवपुजा करतो तेव्हा तेव्हा आपण ह्याचा टिळा श्री हरी विष्णूंना करा. मित्रांनो भगवान श्री हरी विष्णूंचा एखादा फोटो घरात नसेल तर तो पहिला आपल्या देवघरात स्थापन करा. कारण ते पूर्ण सृष्टीचे पालनहार आहेत, संपूर्ण विश्व हे त्यांच्यावर अवलंबून आहे. आपल्या घरातील जे मृत व्यक्ती आहेत ज्यांना आपण पित्र म्हणतो तर अश्या पितरांच्या आत्म्याला शांती त्यांना मुक्ती देण्याचे काम हे श्री हरी विष्णू करत असतात.
म्हणून त्यांची पूजा दररोज करत चला. तर अश्या पद्दतीने त्यांना दररोज तिलक तर करायचा आहेच त्यासोबत आपल्या घरात जितक्या व्यक्ती आहेत, त्यांनी सगळ्यांनी ह्या मिश्रणाचा तिलक करा. ह्यामुळे जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात. आपल्या हातून अनेक चुका होतात अनेक पापकर्म होतात आणि त्यापासून मुक्ती मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. ज्यांना हे दररोज करणे शक्य नसेल त्यांनी किमान हे काम गुरुवारी तरी नक्की करावे कारण, गुरुवार हा विष्णूंचा वार आहे.
आपल्या घरात जर एखादी खूप रागीट व्यक्ती असेल तर किंवा तिचे कामामध्ये मन लागत नाही नेहमी डिप्रेशन मध्ये असते अश्या व्यक्तीस आपण हे मिश्रणाचा तिलक लावत चला भगवान हरी विष्णूंचा नामःस्मरण करा. तसेच ज्यांची बुद्धी चालत नाही त्यांनीदेखील आपली बुद्धी तेज करण्यासाठी हा उपाय करत चला. मित्रांनो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अशा करतो, जर आवडली असेल तर आमच्या लेखाला नक्की लाइक व शेयर करा.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. ह्यामागील कोणती अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही, धन्यवाद.




