नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो जीवन जगत असताना आपले काही लोक मित्र बनतात तर काही लोक शत्रू, आणि हे शत्रू बनलेले लोक आपल्याला त्यांचा त्रास होतो आणि त्यालाच आपण शत्रुपीडा म्हणतो. जेव्हा जेव्हा तुम्ही काही चांगले काम करता तुमची प्रगती होऊ लागते तेव्हा हि प्रगती लोकांच्या डोळ्यात खुपते. आणि हेच लोक तुमचे शत्रू बानू लागतात कधी कधी तर तुमच्या अगदी जवळचे मित्र तुमच्या प्रगतीमुळे शत्रू बनतात.
मित्रांनो तुमच्या ऑफिस मध्ये तुमच्या सहकाऱ्यांकडून तसेच बॉस चा त्रास असेल शेजाऱ्यांचा त्रास असेल किंवा उद्योगधंदयामध्ये तुमचे स्पर्धक असतील त्यांच्यापासून जर तुम्हाला त्रास असेल तर आपण त्याला शत्रूपीडा असे म्हणतो आणि तुमचे हे बलवत्तर झालेले शत्रू आजच्या उपायाने निशबळ होतील त्यांचे बळ निघून जाईल. हा उपाय शत्रुपीडेपासून मुक्ती मिळवून देणारा आहे आणि ह्यासाठी आपल्याला विशेष अशी काहीच लागणार नाहीए हे केवळ आपण आपल्या देवपूजेमध्ये आपण जो दिवा लावतो हा लावताना हा एक छोटासा मंत्र बोलायचा आहे.
मित्रांनो ह्यातील शब्द इतके ताकदवान आहेत कि तुमचे शत्रू तुमच्या पुढे गुढगे नक्की टेकतील. देवपूजा करताना आपण दिवा लावतो त्याचे कारण म्हणजे दिवा लावल्याने शुभ आणि मंगल गोष्टी घडू लागतात, देवीदेवता प्रसन्न होतात म्हणूनच कोणतेही मंगल कार्य असुद्या त्या मंगल कार्यात दिवा हा लावला जातो.
ज्या घरात सकाळ आणि संध्यकाळी दिवा लावला जातो त्या घरातील वातावरण पवित्र अन मंगलमय बनते. आपण जो उपाय करणार आहोत तो उपाय करताना आपण काही नियमांचे पालन करायचे आहे पहिला म्हणजे आपण दिवा लावताना डोक्यवरती टोपी, व स्त्रियांनी पदर घ्यावा. दुसरी गोष्ट आपण हा दिवा आपण जमिनीवर ठेवायचा नाही तर आपण त्याला आसन द्याचे आहे.
नंतर आपण जे तेल आपण वापरणार आहे ते म्हणजे मोहरीचे तेल. हा उपाय आपण शत्रुपीडेसाठी करतोय म्हणून जर आपल्याकडे जर मोहरीचे तेल नसेल तर चमेलीचे तेल आपण वापरू शकता अश्या प्रकारे दिवा लावायचा आहे आणि त्यात २ लवंगा टाकायच्या आहेत. नंतर त्याच दिव्ययाने आपण हनुमानांची आरती करायची आहे व त्यांना प्रार्थना करायची आहे कि आपल्या शत्रुपीडेपासून त्या जाचापासून मुक्त कर अशी प्रार्थना करायची आहे.
आणि त्याबरोबर एक मंत्र बोलायचा आहे तो म्हणजे शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥ मित्रांनो आपल्यापैकी अनेकजण सायंकाळच्या वेळी अनेकजण हा मंत्र बोलत असाल पण आज पासून खास करून शत्रुपीडेसाठी ह्या मंत्राचा जप अवश्य करा तुम्हाला काही दिवसातच दिसेल कि तुमचे शत्रू तुमच्या पुढे नतमस्तक होतील. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




