बऱ्याच लोकांना माहिती नसेल पशुप्रती व्रता बद्दल. पण काही पुरणात याचा उल्लेख आहे. जसेकी शिवमहा पुराण आणि कंद पुराण यामध्ये पशुपती उपासने बद्दल माहिती दिली गेली आहे. जो कोणी हे व्रत कोणत्याही महिन्यात पाच सोमवार करतो त्या व्यक्तीला महादेवाचे आशीर्वाद नक्की मिळतात. त्यसाठी त्या व्यक्तीने निष्टेने आणि श्रद्धा ठेऊन तसेच मनात कोणतीच शंका न येता हे व्रत केले पाहिजे.
तुमच्या मनात कोणतीही इच्छा आसूदय किंवा कोणतेही काम असुद्या, जी खुप दिवसापासून अपूर्ण आहे. ती इच्छा किंवा काम नक्की पूर्ण होऊ शकते. हि इच्छा पूर्ण होण्यासाठी वर्षातील कोणत्याही पाच सोमवारी पशुपती व्रत केल्यास त्याचे लाभ नक्की मिळते. हे व्रत करताना काही नियमनाचे पालन करावे असे सागितले गेले आहे. त्याचे योग्य पालन केले तर त्याचे लाभ आपल्याला नक्की मिळतात.
कोणत्याही कामात यश प्राप्त करण्यासाठी तसेच मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी पशुपती व्रत खुप महत्वाचे आहे. आणि त्याच सोबत त्याचे नियम सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. जर का पण त्या नियमांचे योग्य पालन केले नाही तर त्याचे योग्य लाभ आपल्याला मिळणार नाही. हि उपासना करण्यासाठी काही नियम आहेत.
ज्या सोमवार पासून आपण हे व्रत करणार आहोत त्या पासून पुढील पाच सोमवार हे व्रत करायचे आहे. जर का एखाद्या सोमवारी काही अडचणी आल्या तरी पुढच्या सोमवार पासुन पुढे चालू शकते. मनात कोणतीही शंका अनु नका. कोणतेही व्रत असो किंवा उपासना असो हि पूर्ण श्रद्धेने आणि निष्टेने केल्यास त्याचे योग्य फळ आपल्याला नक्की मिळते.
हे व्रत करण्यासाठी सोमवारी सकाळी आपल्याला लवकर उठायचे आहे. स्वच्छ अंघोळ केल्यावर सूर्याचे दर्शन घेऊन त्याला जल अर्पण करा, त्यासोब “ॐ सूर्य देवाय नमो नमः” हा मंत्र जप कायचा आहे. त्यानतंर आपल्या घराच्या जवळील किंवा ज्या ठिकाणी महादेवाचे मंदिर आहे त्या ठिकाणी जायचे आहे. आणि विधिवत पूजा करायची आहे. महादेवाला अभिषेक कायचा आहे. पूजे साठी जे साहित्य लागणार आहेत ते सर्व आल्या घरातून घेऊन जायचे आहे.
महादेवाला सर्वात जे प्रिय आहे ते तुम्हला घेऊन जायचे आहे. बेलपत्र हे अवश्य घेऊन जा तसेच एक तब्य पाणी सुद्धा आपल्या घरातून घेऊन जायचे आहे. त्या नंतर दिवस भर आपल्याला उपवास करायचा आहे. आहारात फक्त फळे घेतली तरी चालेल. दिवस भर उपवास केल्यानंतर सायंकाळी पुन्हा मंदिरात जायचे आहे. जाताना काही सामुग्री घेऊन जायचे आहे.
संध्याकळी आपण मंदिरात जाणार आहोत त्या वेळेस जाताना सहा तुपातील दिवे घेऊन जायचे आहे. तसेच प्रसाद म्हणून काही तरी गोड घेऊन गेलो तरी चालेल. त्यानतंर देवासमोर हात जोडून प्रार्थना कायची आहे. आपल्या सर्व अडचणी निघून जाव्यात तसेच मनातील इच्छापूर्ण व्हावी अशी प्रार्थना करा. त्यानतंर या सहा तुपातील दिव्या पैकी पाच प्रज्वलित करा आणि जो काही गोड पदार्थ आणला आहे तो प्रसाद म्हणून तेथे ठेवा.
त्यानंतर दर्शन घेऊन वापस घरी आल्यावर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्या समोर उजव्या बाजूस जो एक दिवा ठेवला होता तो या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. आणि घरातील सर्व व्यक्तीना प्रसाद द्याचा आहे. आणि त्यानतंर आपण जेवण करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला पाच सोमवार पूजा करायची आहे. हे व्रत कॊणी सुद्धा करू शकतात. तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तसेच अडचणी दुसर होण्यासाठी हे व्रत करू शकतात.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




