नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो २७ एप्रिल मंगळवारचा दिवस आणि ह्या दिवशी अली आहे चैत्र पौर्णिमा. हिंदू धर्मशास्त्रामध्ये ह्याचे खूप मोठे महत्व सांगितले आहे. ह्या चैत्र पौर्णिमेस आपण हनुमान जयंतीचा उत्सव आपण साजरा करतो. ह्याच दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता. हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये अजूनही कित्येक साधूंना ते दर्शन देतात. आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करणे सोपे असते. अगदी सध्या सध्या उपायांनीदेखील हनुमंताना प्रसन्न करता येते. ह्या दिवशी केलेले छोटे छोटे देखील उपाय, हनुमंताना प्रसन्न करते. ज्यांच्या जीवनात नेहमी अडचणी असतात, ज्यांच्या घरी नेहमी कोणी ना कोणी आजारी पडत असते अश्या लोकांनी हनुमान जयंती दिवशी अत्यंत प्रभावी व सोपा असा उपाय आपण करू शकता. मित्रांनो तसे तर पौर्णिमा प्रेत्येक महिन्यातच येत असते. पण हि उद्याची येणारी पौर्णिमा हि हिंदू नववर्षातील पहिली पौर्णिमा आहे. आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो आजारपण दूर करतो तसेच जीवनामध्ये खूप मोठ्या अडचणी आहेत एका माघे एक संकटे येतात. अश्या सर्वांवर एक उपाय आपण आपल्या आजच्या लेखामध्ये सांगणार आहोत.
सध्याच्या ह्या महामारीच्या काळात देवळे मंदिर सर्व बंद आहेत पण ज्यांच्या घराशेजारी कोणते हनुमानांचे मंदिर आहे त्यांनी तिथे जाऊन उपाय करा जरी शक्य नसेल तरी चालेल तुम्ही शासकीय नियमांचे पालन करा व घरातच आपण मारुती रायांचे फोटो किंवा मूर्ती ठेवून हा उपाय करू शकता. फक्त मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवा. मनोभावे करा, ह्यांची फोटो किंवा मूर्ती स्थापन करताना त्यांचे मुख हे दक्षिण दिशेला राहील अश्या ठिकाणी आपण ती ठेवायचीआहे. विधिवत त्याची पूजा करावी. विशेष करून हा उपाय रात्री ११ नंतर केल्याने हा उपाय अतिशय फलदायी मानला जातो. मित्रांनो हनुमंताची पूजा करताना त्यांना जे प्रिय आहे जसे कि लाल रंगाची फुले त्यांना अर्पण करावीत. त्यांना गूळ अत्यंत प्रिय आहे असा तो प्रसाद म्हणून आपण त्यांच्यासमोर आपण ठेवायचा आहे त्याच बरोबर आपण फुटाणे देखील थवायचे आहेत. सोबतच आपल्या किचन मधील २ साबूत लवंग अश्या लवंगा आपण त्यांच्या चरणी ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या घरी जाईचे तेल आसेल किंवा मोहरीचे तेलाचा दिवा आपण तिथे प्रज्वलित करा. ज्यांना शक्य असेल तर आपण लाल रंगाची वात आपण त्या दिव्यात लावावी.
त्यानंतर आपण हनुमंतासमोर हाथ जोडून प्रार्थना करायची आहे कि आपल्यावरती जे काही संकटे आहेत, जे काही आजारपण घरावरती आहे ते सर्व दूर होउदे.आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आल्या आहेत त्यापासून सुटका मिळो अशी प्रार्थना आपण करायची आहे आणि त्यानंतर आपण हनुमान चालीसा चे पाठ करा. त्यानंतर आपण जय श्री राम ह्या मंत्राचा ११ वेळा जप करा. हा जप केल्याने हनुमंत लवकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. अश्या प्रकारे पूजा अर्चना झाल्यानंतर आपण आपली मनोकामना जि आहे ती बोलून दाखवा व आपण हनुमानांचे डोके टेकून दर्शन घ्या. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




