सध्याच्या काळात धावपळीच्या जीवनात पचनाच्या समस्या ह्या खूप वाढल्या आहेत. आपल्या शरीरातली पचनशक्तीच जर बिघडली तर दुर्लक्ष करणे खूप धोकादायक होते. तसेच ऍसिडिटी चे प्रमाण वाढल्यामुळे आपल्या शरीराला खूप त्रास होतो.आपल्या शरीराची पचनशक्ती बिघडली असेल तर आपल्याला ऍसिडिटी चा त्रास होतो.
पित्त वाढल्याची लक्षणे:-
१) मळमळ होणे आणि उलटया होणे.
२) ओटीपोटात दुखणे.
३) जुलाब.
४) भुक न लागणे.
मित्रानो पित्त होऊन हा त्रास होऊ नये यासाठी कोणता अपार घायला पाहिजे , तसेच कोणती काळजी घेतली पाहिजे ते आपण खालीलप्रमाणे पाहुयात.
मित्रानो आपण आपल्या जेवणाच्या वेळा ह्या बदलायच्या नाही. आपण वेळेवर जेवण केले पाहिजे. जेवण जास्त तिखट पदार्थ खु नयेत. जेवण हे व्यवस्तीत चावून केले पाहिजे. जेवताना सरळ बसले पाहिजे. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये.
मित्रानो जेवण झाल्यावर बडीशोप हि खावी त्यामुळे पण आपण खाल्लेलं अन्नाचे पचन हे व्यवस्थित होते.बडीशोप हि खूप गुणकारी आहे, तसेच बडीशोप हि पित्ताचा नाश करते.
मित्रांनो एकाच वेळी खूप जेवण करू नये, त्यापेक्षा अन्न हे थोडं थोडं खाल्लं पाहिजे मन्हजे ऍसिडिटीचा त्रास हा कमी होतो. तसेच जेवनात ताक हे घेतलेच पाहिजे. ताक पिल्यामुळे आपण खाल्लेलं अन्न हे पचत आणि आपल्याला ऍसिडिटीचा त्रास हा कमी होण्यास मदत होते.




