महाशिवरात्री हि एक मार्च मंगळवार अली आहे. महाशिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण देशात केला जातो. माग महिन्यात येणाऱ्या शिवत्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. या दिवशी बरेच लोक महादेव यांच्या नावाने उपवास व्रत करतात दिवस भर त्यांची उपासना करतात. जर शक्य असेल तर आपल्या घरात दिवसभर अंखड दिवा प्रज्वलित करून ठेवा.
त्याच सोबत आपण एक छोटासा उपाय करायचा आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील नकरात्मकता कमी होईल, त्याच सोबत ज्या वाईट गोष्टी आपल्या नशिबात आल्या आहेत. त्या सुद्धा दूर होण्यास मदत होईल. बऱ्याच लोकांना आर्थिक समस्यांना सारखे सामोरे जावे लागते त्या सुद्धा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. घरातील सतत होणारे वादविवाद सुद्धा कमी होण्यास मदत होईल.
या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी जर का आपण हा उपाय केला तर याचे लाभ चांगले मिळतात. हा जर आपण उपाय केला तर जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात. जाणून घेऊ महाशिवरात्रीच्या दिवशी कोणता उपाय करायचा आहे. एक गोष्ट लक्षात असुद्या हा उपाय आपल्याला दुपारी बारा वाजता आपल्याला करायचा आहे.
हा जो उपाय आहे तो महिलांनी किंवा पुरुषांनी केला तरी चालतो. हा उपाय करताना पुरुषांनी पांढरे वस्त्र परिधान करावे आणि महिलानी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. या उपायात लागणाऱ्या वस्तू पैकी एक वस्तू म्हणजे काळे तीळ. हे तीळ आपल्याला बाजरात सहज रित्या मिळून जातात. हे तीळ घेतल्यानंतर त्यातील चौदा चिमूट काळे तीळ आपल्या घ्याचे आहे. हे तीळ आपल्या डोकावरून सात वेळा ओवाळायचे आहे.
हे झाल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून हे तीळ सात वेळा ओवाळून घ्याचे आहे. त्याच सोबत हे तीळ घरातील प्रत्येक रूम मधून हे तीळ फिरून आणायचे आहे. आणि त्या नंतर आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर चौदा वेळा आपल्या मुठीत असलेल्या तिळासहित आपट्याची आहेत. या ठिकणी एक गोष्ट लक्षात असुद्या उबरठ्या बाहेर जाऊन हा उपाय करायचा आहे.
तीळ सडणार नाही याची काळजी घ्या. त्या नंतर आपल्या अशा ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी शांता आहे. जास्त लोकांची वर्दळ नाही. त्या ठिकाणी जात असताना शनी देवाचे नामस्मरण करत जावे. आपल्या जीवनात ज्या वेळेस वाईट दिवस सुरु होतात त्या वेळेस शनी देवाची युती हि राहू आणि केतू सोबत झालेली असते.
त्याठिकाणी जात असताना शनी देवाचा जप तुम्ही करू शकतात जप असा आहे “ॐ शं शनैश्चराय नमः ” त्याच सोबत महाशिवरात्री असल्यामुळे तुम्ही ओम नमः शिवाय हा सुद्धा मंत्र जप करू शकतात. हे तीळ त्या ठिकाणी टाकून परत घरी याचे आहे. हात पाय स्वच्छ धून महादेवाचे दर्शन घायचे आहे. आणि प्रार्थना करायची आहे या सर्व संकटातून मुक्ती देण्याची.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




