घरगुती उपाय

बुधवारी किचनमधील शेगडीखाली ठेवा हि एक गोष्ट, घरातून गरिबी निघून जाईल

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, जीवनात गरिबी असेल तर अश्या वेळी आपण एक छोटासा उपाय आपण बुधवारच्या दिवशी नक्की करा. सोबतच ज्यांच्यावर कर्ज फेडणे आहे आणि ते फिटत नसेल तर असे लोक हि हा उपाय करू शकता. बुधवारच्या संपूर्ण दिवभरात किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केला तरी चालेल.

ह्या उपायासाठी आपल्याला काही सामग्री काही गोष्टींची गरज लागेल. दोन हिरव्या रंगाचे कागद, जर हिरवा कलरचा कागद नसेल तर पांढऱ्या रंगाचा कागद घेऊन आपण त्यावर हिरव्या रंगाच्या शाईने ५ हा अंक लिहायचा आहे व मग तो आपण वापरू शकता. त्यानंतर आपण ह्या कागदांवरती थोडे थोडे धने ठेवायचे आहेत. धने हे लक्ष्मीकारक आहेत, धने हे आपल्या जीवनात धन निर्माण करून देतात ते बुध ग्रहाचे देखील कारक आहेत. योग्य निर्णय क्षमता घेण्याची शक्ती आपल्यामध्ये ह्यामुळे येते.

त्यानंतर आपण ह्या कागदांची पुडी बांधणार आहोत, त्यानंतर त्या कागदांपैकी एक पुडी आपण स्वतःवरून वरायचे आहेत म्हणजेच एखाद्या व्यक्तीची आपण नजर काढतो तशी ह्या पुडीने आपली नजरच काढायची आहे. अश्याच प्रकारे आपल्या घरात जितके लोक आहेत अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची अश्या पद्दतीने हि पुडी वरायची आहे. व त्यानंतर आपण देवघरात जाऊन आपल्या देवघरावरून देखील हि पुडी वरायची आहे. तसेच ती संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे.

मित्रांनो फिरवल्यानंतर माता लक्ष्मीची तस्वीर किंवा फोटो नक्की असेल त्या फोटोच्या पायाशी म्हणजेच माता लक्ष्मीच्या चरणांशी हि पुडी आपण ठेवायची आहे. त्यानंतर आपण हि पुडी आपण आपल्या घरातील शेगडी आहे त्या शेगडीला चार पाय असतात तर त्याच्या पुढील कोणत्याही पायाजवळ हि पुडी आपण ठेऊन द्याची आहे.

त्यानंतर आपण एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दुसरी पुडी जी आपण तयार केलेली आहे ति आपण बुधवारी रात्री झोपताना उश्याखाली ठेवायची आहे. मनोमन प्रार्थना करायची आहे कि आपली जी काही समस्या असेल ती दूर कर म्हणून व नंतर आपण झोपी जावे.

हे पण वाचा :-  कामात यश प्राप्तीसाठी एक नारळ इथे ठेवा, काम यशस्वीरीत्या पार पडेल.

सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपण ती पुडी आपण आपल्या हातात घेऊन घराबाहेर जाऊन तिला जाळायचे आहे. ज्यांना घराबाहेर शक्य नसेल त्यांनी घराच्या मुख्य दारावर जाळली तरी चालेल. ती जाळल्यानंतर आपण ती एखाद्या पात्रात जाळावी. ती जळत असताना आपण आपली इच्छा पुन्हा बोलून दाखवयाची आहेत. त्यानंतर आपण ह्याची झालेली राख असेल ती व जी पुडी आपण शेगडी खाली ठेवली होती ती आपण एकत्र घेऊन एखाद्या घराबाहेरील झाडाच्या बुंध्याशी गाडून टाकायची आहे.

एक गोष्ट लक्षात ठेवा जर आपल्याला खूप मोठे आर्थिक संकट असेल तर आपण जी गॅस किंवा शेगडी खाली ठेवलेली पुडी जी आहे ती पुढील बुधवारपर्यंत तशीच ठेवा व पुढील बुधवारी ती गाडा. आणि नंतर आपण पुन्हा एकदा आपण त्याजागी पुडी ठेवायची आहे कितीही मोठी गरिबी असूद्यात ती निघून जाईल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.