फूड

जेवण झाल्यानंतर हि एक वस्तू तोंडात टाका सर्व समस्या होतील दूर

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. शास्त्रामध्ये वनस्पतीकल्प मधील आहारकल्प ह्यात एक गोष्ट सांगितली आहे, कि आपल्या शरीरात नऊ ग्रह वास करतात चेहऱ्यापासून गळ्यापर्यंत सूर्य, हृदयामध्ये चंद्र, बुध गुरु हातामध्ये तर पायात शुक्र व शनी निवास करतात आणि ह्यातील जर काही ग्रह जेव्हा बिघडतात.

तेव्हा आपल्या शरीराच्या भागांवर विपरीत परिणाम घडून आणतात. जसे के विविध आजार, कर्जबाजारी होणे, धनाचा नाश, अपमान होणे, आपापसात सतत भांडणे होणे. मुलांची सतत भाडणे होणे, ह्या सर्व गोष्टी कोणत्या ना कोणत्या ग्रहांच्या बिघडण्याने होतात.

शास्त्रात ह्यावर जालीम उपाय सांगितला आहे. एक अगदी छोटीशी वस्तू आपण आपले जेवण झाल्यावर खाल्याने ह्या नऊ ग्रहांची पीडा, नऊ ग्रहांची दुर्दशा हि नीट होणार आहे. खूपच प्रभावशाली व खात्रीशीर उपाय आहे.

आणि विशेष म्हणजे ह्या उपायासाठी कोणताही खर्च नाही. तुम्हाला फक्त जेवणानंतर मग ते सकाळी व संध्यकाळी जेव्हा जेवण कराल तेव्हा आपण जेवण झाल्यानंतर एक ग्लास पाणी पिऊन आपले तोंड स्वच्छ करायचे आहे आणि त्यानंतर आपण थोडीशी बडीशोप व छोटासा गुळाचा तुकडा आपल्याला खायचा आहे.

ह्याला व्यवस्थित चावून खायचे आहे व त्यानंतर आपण थोडे पाणी प्याचे आहे. हा उपाय अगदी छोटासा आहे मात्र आपली जी नऊ ग्रहांची जी दुर्दशा झालेली आहे ती ह्या उपायाने दूर होते. बडीशोप मध्ये बुध अधिष्ठाय च्या रूपात असतो तसेच त्याच्या वरच्या भागात मंगल असतो बडीशोप मध्ये एक प्रकारचा खारट किंवा तुरटपणा असतो तो राहू केतूला प्रसन्न करतो.

तसेच बडीशोप मधील गोडवा असतो तो शुक्राला प्रसन्न करतो. बडीशोप मध्ये मधील पांढरा जो भाग असतो तो चंद्राला प्रसन्न करतो. गुळात गुरूला प्रसन्न करायची ताकद असते म्हणजे नवग्रहांना प्रसन्न करण्याची ताकद ह्या दोन पदार्थांमध्ये असते. ग्रहदशांना पिडांना मिटवण्यासाठी ह्या दोन पदार्थांना खाणे फारच महत्वाचे ठरते.

हे पण वाचा :-  नीरा म्हणजे काय? नीरा कशी तयार केली जाते..

म्हणूनच आपण प्रेत्येक जेवणानंतर बडीशोप व गूळ हे थोड्या प्रमाणात खा परंतु त्याचा पूर्ण अर्क तुमच्या शरीरात जाईल असे बारीक चावा म्हणजे तुमच्या शरीरातील नसा नसामध्ये हा अर्क गेल्याने आपल्या शरीरातील नऊ ग्रहांचे अंश आहेत ते प्रसन्न होतील.

आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व कार्य सुरळीत पार पडतील. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.