नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो रविवारी रात्री झोपण्यापूर्वी बेंबीवर बोट ठेवून बोला हा मंत्र ह्या मंत्राच्या प्रभावाने तुमचे व्यक्तिमत्व इतके आकर्षीत होईल कि लोक तुमच्या कडे आकर्षित होतील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा ठसा समाजामध्ये पडेल सोबतच धन, वैभव, पैसा तुमच्या पायाशी लोळण घेऊ लागेल. मित्रांनो रविवराच्या रात्री झोपण्यापूर्वी आपण हा उपाय करायचा आहे. उपाय नक्की कसा करावा त्याचे लाभ काय आहेत ह्याची सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या लेखात घेणार आहोत.
मित्रांनो हा उपाय करण्यापूर्वी आपण हाथ पाय स्वच्छ धुवावेत ज्यांना शक्य असेल त्यांनी स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करा. आपण झोपण्यापूर्वी एक वाटी घ्या त्या वाटीत थोडीशी हळद घ्या त्यात थोडे पाणी टाकून त्याचा चांगला घोळ बनवायचा आहे. आणि बेंबीवर जे आपण बोट आपण ठेवणार आहोत ते करंगळी चे बोट ज्याला अनामिका असे म्हणतात ते आपण आपल्या उजव्या हाताचे घ्याचे आहे. ह्या बोटाच्या खाली सूर्याचे क्षेत्र आहे आणि सूर्याला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कुंडलीतील सूर्य मजबूत बनवण्यासाठी आपण ह्या अनामिकेचा वापर करायचा आहे.
ज्या व्यक्तींच्या कुंडलीतील सूर्य मजबूत असतो. त्या व्यक्तींच्या कार्यात त्या व्यक्ती कार्य नेतृत्वक बनतात. सोबतच अश्या व्यक्तींना समाजामध्ये मानसम्मान, प्रतिष्ठा ह्याची प्राप्ती होते. धन, वैभव हे त्यांच्या पायाशी लोळण घेताना आपल्याला दिसते. आपण ह्या उपायासाठी आपण आडवे झोपायचे आहे आणि हे जे बोट आहे उजव्या हाताचे करंगळी हळदीसोबत ते आपण आपल्या नाभीला स्पर्श करायचे आहे.
मित्रांनो नाभीचे ज्योतिषशास्त्रामध्ये खूप मोठे महत्व सांगितले आहे. आपण कोणत्याही प्रकार्चे पदार्थ नाभीजवळ लावा ते नाभीत शोषले जातात. नाभीचे खूप मोठे माहात्म्य आहे असे म्हणतात कि जर रोज आपण नाभीत जर मोहरीचे तेल लावले तर आपली त्वचा ग्लॉ करू लागते आरोग्य सुधारते.
तर अश्या प्रकारे आपण हळद असलेले अनामिका आपण आपल्या नाभीस लावल्यानंतर आपण ह्या एका मंत्राचा जप करायचा आहे. आणि हा मंत्र आहे गायत्री मंत्र ‘ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।’ हा मंत्र आपण म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण ३ वेळा आपण ओम ह्याचे उच्चारण करायचे आहे. गायत्री मंत्र आणि त्यानंतर ह्या ओम चे ३ वेळा उच्चारण अश्या प्रकारे आपला मंत्र तयार होतो.
ज्यांच्या जीवनात दरिद्रता आहे, पैसा येत नाही अश्या लोकांनी गायत्री मंत्रासोबत ‘ओम’ च उच्चारण करू नका तर त्यांनी माता लक्ष्मीच्या बीजमंत्रातील ‘श्रीं’ ह्याचे ३ वेळा उच्चारण करा. मित्रांनो हे सर्व करत असताना आपले सर्व लक्ष आपल्या नाभीवर केंद्रित असावं आणि सोबतच आपण माता लक्ष्मीचं स्मरण करावे जर आपण श्रीं ह्या नामाचे उच्चारण करत असाल आणि जर आपण ओम ह्या नामाचे उच्चारण करत असाल तर तुम्ही माता गायत्रीचे स्मरण करा. आणि सोबत सूर्यदेवतेचे देखील स्मरण आपण करायचे आहे.
तर मित्रांनो हा उपाय आपण रविवारी रात्री झोपताना नक्की करा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




