समुद्रशास्त्रात हस्तरेषाच्या ओळी व वेगवेगळ्या चिन्हांद्वारे त्या व्यक्तीचे भविष्य, आरोग्य, जीवन, कौटुंबिक स्थिती आणि स्वभाव याबद्दल बरीच माहिती आहे. हस्तरेखावरील ओळींबरोबरच, एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असलेला तीळ याचे देखील विशेष महत्तव आहे, ज्याचे समुद्रशास्त्रात विशेष महत्त्व आहे.समुद्रशास्त्रानुसार जिथे शरीराच्या काही भागात बनविलेले काही तीळ शुभ मानले जाते, तर काहींना अशुभ मानले जाते.चला शरीराच्या भागांमध्ये बनलेल्या तीळचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया …

1. पाठीवर तीळ
बर्याच जणांच्या पाठीवर तीळ आहे. हा तीळ आकारात लहान किंवा मोठा दोन्ही असू शकतो.अशा परिस्थितीत, ज्या लोकांच्या पाठीवर तीळ आहे ते अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्वाने समृद्ध असतात. असे लोक अत्यंत कमी वेळात शिखरावर पोहोचतात.पाठीच्या उजवीकडे तीळ असणारे व्यक्ती बुद्धिमान आणि भाग्यवान असतात.पाठीच्या डावीकडे तीळ असणारे लोकं कंजूस कंजूश प्रवृत्तीचे असतात.

२. पोटावर तीळ
काही लोकांच्या पोटावर तीळ असते. समुद्रशास्त्रानुसार पोटावर तीळ असणे चांगले लक्षण नाही. अशी व्यक्ती अधिक आजारी पडतात आणि अशा व्यक्तीसाठी खूप खर्च करावा लागतो ह्यांचे राहणे खूप महाग असते. अशा व्यक्तीकडे खूप कमी पैसे असतात.असा व्यक्ती खाण्याचा शौकीन असतो. परंतु तीळ नाभीच्या जवळपास असेल तर व्यक्तीला धन समृद्धी प्राप्त होते.

3. तळहातावरील तीळ
ज्या लोकांच्या तळहाताच्या मध्यभागी तीळ असतो आणि मूठ बंद केल्यावर तो तीळ लपतो हे अतिशय शुभ मानले जाते. अशा लोकांना कठीण परिश्रम न करूनही पैसे येतात.उजव्या हातातील वरील भागावर तीळ असणारे व्यक्ती धनवान असतात.

४. ओठांवरील तीळ
काळ्या रंगाचा तीळ गालावर किंवा ओठांवर असेल तर तर क्या बात है… तुमच्या सुंदरतेला चार चाँद लावण्यासाठी हा एकच तीळ पुरेसा ठरतो. या तिळांमुळेही व्यक्तीच्या सुंदरतेत आणि आकर्षणात भर पडते.ओठांवर तीळ एखाद्या व्यक्तीला आनंद आणि समृद्धीने समृद्ध करते. अशा लोक इतरांच्या मदतीने भरपूर पैसे कमवतात आणि ऐशो आयुष्य आरामात जगतात.पण हाच तीळ ओठांच्या खालच्या बाजुला असेल तर मात्र दरिद्र्याची सूचना देतो

५. गुरु पर्वतवरील तीळ
जर गुरु पर्वताच्या शिखरावर आपल्या तळहातावर तीळ असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनात कधीही पैशाची कमतरता येणार नाही. अशा लोकांचे जीवन सुख आणि समृद्धीने असते. ज्या व्यक्तीच्या तळहातावर गुरु पर्वतावर तीळ असेल तर त्याला आपल्या जीवनात पैसेचा अभाव राहत नाही. जर कुठलीही आर्थिक अडचण येते तर ती थोड्या वेळेसाठीच असते कायम स्वरूपात नाही.




