नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक मंत्र जो आपण पाणी पिण्यापुर्वी म्हणावा. जेणेकरून आपल्या सर्व समस्यांतून मुक्ती मिळेल. ज्या लोकांना तुमचं पटत नाहीत तुमच्याशी पटत नाहीत. ते लोक तुमच्याशी विरोध करणे सोडतील उलट ते लोक तुमच्याशी मैत्री करू पाहतील. जे कोणी त्रास देणाऱ्या व्यक्ती असतील त्या समोर येतील. शत्रूच्या कारवाया उघडकीस येतील.
मित्रांनो हा मंत्र आपण पाणी पिण्यापुर्वी सात वेळा म्हणायचा आहे व नंतर हे पाणी आपण प्याचे आहे. ह्या मंत्राचा प्रभाव आपण वाढवण्यासाठी दररोज सकाळी आपण उठल्याबरोबर चूळ भरा आणि खाली एका जागी बसून तुमच्या आवडत्या देवीदेवतेचे तिच्या नावाचा मंत्राचा जप करा. जसे कि स्वामी समर्थांना मानत असाल तर श्री स्वामी समर्थ भगवान शंकरांना मानत असाल तर ओम नमः शिवाय. ज्या देवतेवर आपली श्रद्धा आहे त्या देवतेच्या मंत्रांचा किंवा नावाचा ५ मिनटे किंवा २१ वेळा आपण जप करा. त्यानंतर आपण आपले सर्व दैनंदिन कामे करायची आहेत.
ह्यामुळे आपले मन पवित्र बनते व आपले मन वाईट विचारांपासून दूर राहते. म्हणून दिवसभर फ्रेश वाटते. जेव्हा तुम्ही अंघोळ कराल त्येवली तुम्ही चिमूटभर साखर घराबाहेर नक्की टाका ह्यामुळे काय होते तर जे लहान लहान जे जीवजंतू असतात ते साखर खाऊन संतुष्ट होतात. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या वर जर कर्जसमस्या असेल तर हे कर्ज फिटू लागते. कोणी शत्रू असेल तर त्याचे मन तुमच्याविषयी अनुकूल बनते.
मंगळवार असेल मसूर डाळ घराबाहेर टाका. बुधवार असेल तर थोडीशी उडीद डाळ घराबाहेर टाकून द्या गुरुवारच्या दिवशी आपण भाजलेले जे चणे असतात ते टाकू शकता, शुक्रवारी मूग टाकल्यास आपल्या सर्व कर्ज समस्या तर मिटतीलच परंतु आपल्या पैस्याच्या समस्या देखील सर्व दूर होतील व घरात पैस्याची चणचण कधीच भासणार नाही.
आणि आता आपला मुख्य उपाय, आपण हे चणे किंवा डाळ टाकल्यानंतर आपण एका पेल्यात पाणी घ्याचे आहे आणि ह्या पेल्याकडे पाहत आपण हा एका मंत्र आहे तो आपण सात वेळा म्हणायचा आहे. मंत्र आहे ओम चिमी चिमी स्वः। असे सात वेळा आपण हा मंत्र बोलायचं आहे व नंतर हे पाणी आपण प्राशन करायचे आहे.
मित्रांनो तुम्ही जेव्हा घरातून तुमच्या कामाच्या ठिकाणी जात असाल म्हणजे तुमचे ऑफिस किंवा दुकान किंवा फॅक्टरी जिथे तुम्ही काम करता अश्या ठिकाणी जाताना आपण ओम चिमी चिमी स्वः असा मंत्र सात वेळा म्हणा व तिथे गेल्यावर म्हणजे ऑफिस ला गेल्यावर आपण पाणी प्याचे आहे. साधारण १५ दिवस आपण हा उपाय करून पहा तुम्हाला स्वतःला फरक दिसून येईल.
तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तुमच्या मनाप्रमाणे सर्व कामे घडतील. आणि दिवसातून तुम्हला केव्हाही वेळ मिळेल तेव्हा आपण ह्या मंत्राचा जप करा. अत्यंत प्रभावशाली असा हा मंत्र आहे. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




