रशियाला जाणून MBBS करण्याचे मुख्य कारण हे आहे. , भारतातील विद्यार्थी MBBS करण्यासाठी रशियाला जाण्यामागील कारणे घ्या जाणून, Students from India to Russia to do MBBS
बातम्या

भारतातील विद्यार्थी MBBS करण्यासाठी रशियाला का जातात या मागील मुख्य कारण जाणून घ्या.

रशिया आणि युक्रेन यांचे युध्द सुरु झाले. आणि सर्व देशाचे लक्ष या दोन देशा कडे लागले. विविध मुद्यांवर हे दोन देश आपली बाजू मांडत असताना काही महत्वाच्या गोष्टी सोमोर येऊ लागल्या. त्या म्हणजे त्या ठिकाणी अडकलेले विविध देशील लोक आणि त्या ठिकाणी शिकायला गेलेले विद्यार्थी. त्याच सोबत भारतातून त्या ठिकाणी शिकायला गेले MBBS चे विद्यार्थी मदतीसाठीचे बरेच सोशल पोस्ट समोर आल्या.

भारतातील विद्यार्थी MBBS करण्यासाठी रशियाला का जातात.

भारतातील बऱ्याच लोकांना भारतीय विद्यार्थी MBBS करण्यासाठी या दोन देशात जास्त प्रमाणत जातात याबद्दल माहिती नव्हती. आणि बरेच लोक याची माहिती घेत होते कि रशिया मध्ये जास्त प्रमाणत MBBS करण्यासाठी का जातात. कारण सामान्य लोक हे समजत असे कि भारतीय विद्यार्थी फक्त अमेरीका या देशात जास्त प्रमाणत जातात.

भारतातील विद्यार्थी MBBS करण्यासाठी रशियाला का जातात याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. देशात कमी असलेल्या मेडिकलच्या सीट हे कारण जी असले तरी इतर बाबी महत्वाच्या आहेत. महाराष्ट्राचे उदाहरण घ्याचे झाल्यास. MBBS साठी नीट परीक्षा (NEET Exam) हि चांगल्या मार्काने पास होण्याची गरज आहे. कारण या ठिकाणी असलेली स्पर्धा.

महाराष्ट्रातुन रशियाला MBBS करायला जातात इतके विद्यार्थी

जवळपास दरवर्षी या परीक्षेसाठी एक लाख पेक्षा जास्त विद्यार्थी बसतात आणि महाराष्ट्रा मध्ये MBBS साठी जवळपास नऊ हजार सीट आहेत. यावर असे दिसून येते कि खुप मोठी स्पर्धा या ठिकाणी आहे.

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि त्या तुलनेत MBBS साठी कमी असलेल्या सीट यामुळे याठिकाणी खुप स्पर्धा आहे. जे विद्यार्थी MBBS करण्याची इच्छा आहे पण कमी मार्क पडल्यामुळे MBBS करू शकत नाही अशा स्टुडंट साठी हा एक चांगला पर्याय आहे. पण बऱ्याच जणांना एक प्रश्न येत असेल कि रशिया किंवा युक्रेन हेच देश का.

हे पण वाचा :-  शेतकऱ्यांना मिळणार सरसकट कर्ज माफी! दरमहा मिळणार १५००० रुपय शेतकऱ्यांना.

महाराष्ट्रातील शासकीय कॉलेज मधून MBBS करण्यासाठी जवळपास सात ते आठ लाख खर्च अपेक्षित आहे. त्याच तुलनेत खाजगी कॉलेज मधून MBBS करण्यासाठी जवळपास साठ ते ऐंशी लाख खर्च अपेक्षित आहे. खाजगी कॉलेजचा खर्च सर्वांचं परवडेल असे नाही. त्यामुळे बरेच विद्याथी हे रशिया या देशाचा पर्याय निवडत कारण त्या ठिकाणी असलेली कमी फीस.

भारतातील विद्यार्थी MBBS करण्यासाठी रशियाला जाण्याचे मुख्य कारण हे आहे.

रशिया मध्ये MBBS कॉलेज हे गव्हर्मेन्टचे आहे. त्याच बरोबर भारतीय विद्यार्थ्यांना दिलीजाणारी सवलत. जवळपास पूर्ण MBBS करण्यासाठी एका विद्यार्थ्याला एकवीस ते पंचवीस लाख खर्च अपेक्षित आहे. त्याच सोबत भारतीय विद्यार्थ्यांणा भाषा निवडण्याची सवलत आहे. रशिया मध्ये MBBS चे शिक्षण इंग्रजी भाषेतून करता येऊ शकते.

तिसरे कारण म्हणजे त्या ठिकाणी चांगल्या शिक्षणाचा दर्जा. अत्याधुनिक उपकरणे व त्यांचे प्रशिक्षण, मोठ मोठया लॅब यामुळे त्या ठिकाणचे शिक्षण दर्जेदार आहे. त्याच सोबत महत्वाची गोष्ट म्हणजे रशिया मध्ये MBBS कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जात नाही. हि पण जमेची बाजू मानली जाते. इतर देशात मात्र वेगळी परीक्षा घेली जाते.

चौथे कारण म्हणजे रशियातून MBBS पूर्ण केल्यानंतर युरोपातील जवळपास तीस देशात त्याला मान्यता देण्यात अली आहे. ज्या लोकांना इतर देशात जाऊन काम करायचे आहे. त्यांच्या साठी हा पर्याय सुद्धा खुप चांगला आहे. ज्या लोकांना भारतात काम करायचं आहे. त्यांच्या साठी एक परीक्षा पास करणे जगरजेचे आहे.

भारतात आल्यावर ज्या लोकांना प्रक्टिस करायची आहे. अशा लोकांनी राष्ट्रीय परीक्षा मंडळ (National Board of Examination) कडून घेतली जाणारी परीक्षा परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (foreign medical graduate exam) पास होणे गरजेचे आहे.

हे पण वाचा: रशिया इतका आक्रमक झाला आहे युक्रेनवर याबद्दल थोडक्यात जाणून घ्या

इतर देशाच्या महागड्या शिक्षण पद्धतीपेक्षा रशियन शिक्षण स्वस्त आहे. तसेच त्या ठिकाणी इतर गोष्टी साठी न होणार त्रास हे सुद्धा मुख्य कारण आहे. त्या ठिकाणी शिक्षणा साठी विद्यार्थी जातात.

हे पण वाचा :-  मकरसंक्रांत साजरी करा ह्या पद्धतीने.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.