नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो पप्रेत्येक वाराचे एक वेगळेच महत्व असते. जसे कि सोमवार हा भोलेनाथ महादेवांचा, मंगळवार हनुमानाचा, बुधवार महालक्ष्मीचा, गुरवार स्वामी समर्थांचा, शुक्रवार देवीचा, शनिवार शनी देवाचा तर रविवार सूर्यदेवाचा आहे प्रेत्येक दिवसाला आपण कोणते ना कोणते व्रत करत असतो ह्यामधील दिवसांचे. जीवनामध्ये काही तर प्राप्त करायचे असेल तर काही मिळवायचे असेल तर आपण प्रेत्येक देवी देवताच्या वारानुसार आपण त्यांचे व्रत करतो पूजा करतो. वाराप्रमाणे आपण उपाय केले तर त्याचे फळ आपल्याला तात्काळ व लगेच भेटते. आजच्या आपल्या लेखामध्ये देखील आपण रविवारचे महत्व सांगणार आहोत व त्या दिवशी काही उपाय करू शकतो हे उपाय केल्याने आपले सर्व संकटे दूर होतील तसेच आपल्याला सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील.
रविवार हा सूर्यदेवतेचा वार आहे आणि त्यादिवशी आपण सूर्यदेवतेची उपासना करावी. ह्या दिवशी सकाळी सूर्य उगवायचा आधी उठून अंघोळ करून उगवत्या सूर्याला एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना आपण ओम सूर्याय नमः ह्या मंत्राचे उच्चारण करावे. यामुळे सूर्यदेवतेची आपल्यावर कृपादृष्टी होते व सूर्याच्या तेजाप्रमाणे आपले आयुष्य उजळून येते. ह्याच दिवशी आणखी एक उपाय म्हणजे तुम्ही ह्या दिवशी घरामध्ये ३ झाडू/ केरसुणी घरामध्ये विकत घेऊन यावी व ती पुजावी त्याला हळदी कुंकू वाहावे व हि केरसुणी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून एखाद्या जवळच्या मंदिरामध्ये कोणाला हि न कळेल अश्या पद्धतीने ठेऊन यावेत. आपण झाडू ठेवतोय हि गोष्ट कोणाला हि कळणार नाही याची दक्षता घ्यावी. या उपायामुळे जसा तो झाडूने मंदिरातला कचरा बाहेर काढला जाईल तसेच आपल्या मनामधील वाईट विचार, नकारात्मकता निघून जाईल आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकटे व अडचणी दूर होतील .
तिसरा उपाय म्हणजे आपल्या काही मनोकामना इच्छा असतील व त्या इच्छा प्राप्ती साठी एकक उपाय, एक वडाच्या झाडाचे पान घ्यावे व त्या झाडाच्या पानाला स्वछ पाण्याने धुवून त्या पानावर चंदनाने त्यावर आपली इच्छा लिहून ते पान वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्याच आहे. आपली इच्छा पूर्ण होतील. आपण जी इच्छा मागीतली आहे ती इच्छा पूर्ण होईपरेंत कोणाला हि कळून द्याच नाही.
रविवारी रात्री आपण झोपायला जाईच्या पूर्वी आपण एक दुधाने भरलेला पेला ठेवावा व तो रात्रभर आपल्या अंथरुणाजवळच ठेवावा अशे केल्याने आपल्या मनातील सर्व नकारत्मक ऊर्जा किंवा आपल्या मनातील भीती नाहीशी होते. आपल्या मनावरचे दडपण कमी होते. आणि हे दूध सकाळी उठून आपण बाभळीच्या झाडाला द्याचे आहे.
रविवारी संध्यकाळी गाईच्या तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा. या उपायामुळे आपल्याला धनप्राप्ती होते तसेच सुख समृद्धी देखील मिळते हे उपाय नक्की करा व तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




